*रोज सकाळी 6:30 ला निदान उठतात.
*केर काढून झाल्यावर , केराचा डबा दाराबाहेर ठेवला जातो , झाडूवाला तो रिकामा करतो .
*लादिवर केर काढला की mop मारला जातो.
*शो केस वर , फ्रिज वर , कपाटावर फडका मारून साफ केला जातो.
*देवाची भांडी घासून साफ करून ठेवली जातात. देवाची भांडी साबणाचे थेंब टाकून हातानेच घासले जातात.
*गुळण्या व पाणी ( अळशी पावडर टाकून ) प्याले जाते.
* लसूण पाकळ्या 3 ते 5 खाव्या.
*अंघोळ करताना त्रिविक्रम जल तर Compulsory
*अंघोळ नंतर देवाला नमस्कार करून शताक्षी प्रसादम खाल्ला जातो.
* रात्री भिजत ठेवलेले बदाम आणि सुकामेवा खातो .
* शेरू साठी 1 डबा भात व चिकन / दुध नाष्टा साठी लागते. शेरू च चिकन कायम एका टोपात धुतलेले चिकन त्यात पाणी + हळद टाकून उकळी आणून दिले जाते. शेरू चा तांदूळ व आपला तांदूळ वेगळा आहे.
* तुळशीच्या वर कपडे सुकत घालू नये
* आई आणि घरातील मोठ्या मंडळींना आदराने हाक मारणे हे स्त्रीचे सौंदर्य अजून वाढवते .
* चार चौघात बसल्यावर नीट बसणे , कारण प्रत्येक जण हा निरीक्षण करायलाच बसला असतो .
* सायंकाळी सहा नंतर म्हणजे दिवा बत्तीच्या आधी गृहलक्ष्मी ने घरी असावे , असा प्रयास असावा.
* भांडी न घासता रात्री झोपी जाणे हे अलक्ष्मी ला आमंत्रण आहे . किंबहुना , मोरीत भांडी पडली रे पडली लगेच आपापली घासून टाकावी.
* वडीलधारी मंडळी भेटताच , त्यांना वाकून नमस्कार करावा , हे उचित संस्कार आहेत .
* जेवल्यावर झाडू मारणे .