या प्रसंगात माझे लाडके बापू यांनी मला कशा प्रकारे वाचवले, हे सांगताना अजूनही अंगावर काटा येतो आहे.
सकाळी मी माझ्या बाईकवरून न्यू पनवेलला कामासाठी निघालो होतो.
ऐरोळी येथे मला पेट्रोल भरायचे होते. तिथे पेमेंटमध्ये काही समस्या आल्याने मी ठरवलं की फक्त ₹100 चे पेट्रोल भरतो आणि पुढच्या पंपावर उरलेलं भरतो.
तो Shell चा पंप होता — ₹120 लिटरच्या भावाने. त्यामुळे जवळजवळ एक लिटरही पूर्ण पेट्रोल भरलं गेलं नव्हतं.
आधी खारघरला गेलो, मग न्यू पनवेलमधील पाच-सहा ठिकाणी काम आटोपलं.
रात्री सुमारे ९ वाजता मी परत घरी निघालो.
डोक्यात मुंबई–सातारा हायवेचा नेहमीचा रस्ता होता. पण मी Google Map लावला तर १ तास ३५ मिनिटांचा रस्ता दाखवत होता.
मला वाटलं हा रस्ता पुढे जाऊन माझ्या ओळखीच्या हायवेला जोडेल, म्हणून मी त्याच रस्त्याने निघालो.
हळूहळू रस्ता निर्जन आणि सुनसान होत चालला.
मी गृहीत धरलं हा कदाचित शॉर्टकट असेल, पण रस्ता मोठा विचित्र आणि लांब वळणाचा होता.
लवकरच लक्षात आलं की मी पनवेल खाडीच्या परिसरात आलो आहे आणि हा रस्ता नवी मुंबई एअरपोर्टच्या भोवती ७५% फेरी मारून मग वहाळ नावाच्या ठिकाणी बाहेर पडतो.
आधीच पेट्रोल खूप कमी — एक लिटरपेक्षा कमी.
सभोवताली वस्ती नाही, पेट्रोल पंप नाही.
रात्री ९:३०–९:४५ ची वेळ.
रस्त्यावर फक्त मोठे ट्रक, कंटेनर आणि काही कार.
बाईक बंद पडली असती तर वाचवायला कोणीच नसतं.
या परिस्थितीत मी घाबरून गेलो आणि चालता चालता डोळ्यात पाणी आलं.
मी मोठ्याने "बापू, वाचवा मला! बापू, मला योग्य रस्त्यावर आणा!" अशी प्रार्थना करू लागलो.
सोबत "रामा रामा, आत्मा रामा, त्रिविक्रम सद्गुरु समर्थ" हा जप मोठ्या आवाजात करू लागलो.
भीतीमुळे घसा कोरडा पडला होता.
बराच प्रवास केल्यानंतर मला एक ठिकाणी हायवे आडवा दिसला.
एका कोपऱ्यावर बाईकवर उभा असलेला एक व्यक्ती दिसला.
मी त्याच्याकडे हात जोडून रस्ता विचारला.
त्याने सांगितले —
"तुम्ही ठाण्याला जायचे म्हणता, पण अगदी वेगळ्याच ठिकाणी आला आहात!"
त्याने मला एका गल्लीतून योग्य हायवे दाखवला आणि जवळचा पेट्रोल पंप कुठे आहे ते सांगितले.
त्याने स्वतः मला घणसोलीपर्यंत मार्ग दाखवत साथ दिली — "इथून लेफ्ट, इथून राईट" सांगत गेला.
मी त्याला मनापासून धन्यवाद दिले.
दोन-तीन ब्रिज ओलांडल्यावर मला HP पेट्रोल पंपाचे साइन दिसले.
गाडी पेट्रोल पंपावर नेऊन फुल टाकी भरली.
तेव्हा लक्षात आलं —
टाकीत पेट्रोल शून्याच्या जवळ होतं.
इतक्या लांबचा प्रवास पेट्रोल न संपता होणे, हे केवळ बापूंचा चमत्कार होता.
मी आईला फोन केला.
आई गुरुवारी प्रवचनात होती, तेव्हा साईबाबांची आरती सुरू होती.
ती मी कानाला लावून ऐकली आणि पुन्हा बापूंची मनापासून प्रार्थना केली.
नंतर समजलं की त्या गुरुवारी बापूंनी "श्री दत्त करुणात्रिपदी" वाचायला सांगितले होते.
त्यात एक वाक्य आहे —
"मी आडमार्गी पाऊल ठेवता, तू आन सी जागेवर भक्ता"
हे वाक्य माझ्या प्रसंगाशी अगदी जुळलं.
बापूंनी मला चुकलेल्या आडमार्गावरून योग्य मार्गावर आणून सोडलं.
त्या काळोख्या रात्री, निर्जन रस्त्यावर, योग्य व्यक्ती भेटणे, पेट्रोल संपलेच नाही —
हे सर्व फक्त माझ्या बापूं माझ्यासोबत आहेत हे सांगणारे संकेत होते.
आज मी बापूंना साष्टांग नमस्कार करून म्हणतो —
"तुमच्याशिवाय हा प्रवास शक्यच नव्हता!"
🙏 हरिओम, श्रीराम, अंबज्ञ 🙏
No comments:
Post a Comment