दुसऱ्या बाळाच्या विचाराआधी खालील प्रश्न प्रत्येक आईवडिलांनी स्वतःला प्रामाणिकपणे विचारायला हवेत:
आपण पहिल्या बाळाला पुरेसे सुख देऊ शकलो आहोत का?
फक्त वस्तूंचे सुख नव्हे, तर वेळ, प्रेम, आपुलकी, आणि भावनिक आधार आपण दिला का?
पहिल्या बाळाकडून आपल्याला आनंद मिळतो का?
त्याच्याशी वेळ घालवताना, त्याचं हसू, बोलणं, खेळणं आपल्याला आनंद देतं का?
पहिल्या बाळावर प्रेम करताना आपल्याला समाधान वाटतं का?
आपण त्याला/तिला जवळ घेतल्यावर मन भरून येतं का, की मनात खंत असते?
जर गेल्या चार-पाच वर्षांत आपण पालकत्वाचे क्षण एन्जॉय करत असाल, त्यात समाधान आणि प्रेम अनुभवत असाल, तर हे लक्षण आहे की दुसऱ्या बाळासाठी आपली मानसिक आणि भावनिक तयारी आहे. कारण एकदा पालक झाल्यावर प्रत्येक बाळासाठी "पहिलं बाळ" सारखंच प्रेम आणि काळजी घेणं गरजेचं असतं.
काही वेळा आजूबाजूचे लोक, कुटुंबीय किंवा समाज एक ठराविक विचार लावतात – की एका बाळाला "साथीदार" हवा, आईवडिलांना "दुसरं नातवंड" हवं, वगैरे. पण हे निर्णय कोणावर तरी "आग्रहाने" घेणं चुकीचं ठरू शकतं. कारण दुसऱ्या बाळाचं जन्म ही केवळ संख्या न वाढवता, संपूर्ण आयुष्यभरासाठी आपली जबाबदारी वाढवणारा निर्णय आहे.
दुसऱ्या चान्सचा निर्णय घेताना पहिल्या बाळावर त्याचा काय परिणाम होईल, हे विचारात घ्यायला हवे. त्याला आपलं प्रेम, लक्ष, वेळ कमी मिळेल का? त्याच्या भावनांना आपण समजून घेत आहोत का?
बाळ म्हणजे फक्त एक बाळ नाही – ती आहे एक नवीन जबाबदारी, नवीन वाटचाल, नव्या अनुभवांची शिदोरी. ही वाट निवडताना ती आपल्याला आनंद देईल की बोझा वाटेल, हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे.
दुसऱ्या चान्सचा विचार करताना, त्यामागचं कारण "प्रेम आणि तयारी" असावं. जर पहिलं बाळ आपल्याला पूर्ण आनंद देत असेल, आणि आपण मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार असाल, तरच हा निर्णय घ्या. पण फक्त सामाजिक अपेक्षा, दबाव किंवा "साथीदार" द्यायची गरज म्हणून घेतला जाणारा निर्णय अनेक वेळा पुढे त्रासदायक ठरू शकतो.
पालकत्व ही स्पर्धा नाही, ती एक भावनिक यात्रा आहे. ही यात्रा जपून, विचारपूर्वक चालणं – हाच खरा दुसरा चान्स घेण्याचा अर्थ.
No comments:
Post a Comment